शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

विषय- विचारांचे सामर्थ्य???

विषय- विचारांचे सामर्थ्य  ????
दिनांक-१८ फेब्रुवारी २०२२

विषय- विचारांचे सामर्थ्य  ????

नमस्कार मित्र हो,मला बहुतेक लोक नेहमीच विचारत असतात कि विचार हे  कसे असावेत? विचारांचे सामर्थ्य म्हणजेच  काय?. कोणते विचार कसे  येतात?  चांगले  व वाईट  विचार कसे ओळखावे ? त्यांची गरज का असते? विचार श्रेष्ठ व समृद्ध का  असावेत? असे एक ना अनेक प्रश्न वेळोवेळी आपल्या समोर उपस्थित होत असतात.मग त्यास आपण सामोरे कसे जातो. ह्या विचारांमुळे आपल्यात काय बदल होतात.तसेच चांगल्या वा वाईट विचारांमुळे आपणास काय फायदा वा तोटा होतो.ह्याचा आपण केव्हा विचार केला आहे का?
 
आणि आजवर जर विचार केला नसेल तर अजून वेळ गेलेली नाही. थोडे थांबा व तुम्हांस त्याची  इत्थंभूत माहीती उद्याच्या लेखात मिळेल.... आहे का तुमची तयारी.??? 

आपले विचार मात्र जरूर कळविण्यास विसरू नका.
########$$$$$$$$##########
शनिवार दिनांक-१९ फेब्रुवारी २०२२

नमस्कार मित्र हो , सुप्रभात !!!!!

तर आज आपण विचार  म्हणजेच काय?ह्याबददल जरा समजून घेऊ या.

शास्त्रीय सिद्धांत असे सांगतो कि  बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार 'चालविणे' म्हणजे विचार करणे. "पुर्वानुभवाच्या मदतीनेच व्यक्तिच्या मनातल्या मनात होणारी प्रक्रिया वा घालमेल म्हणजेच विचार होय". 
विचार प्रक्रिया;-(THINKING PROCESS) - विचार ही मानवी मनाची प्रक्रिया वा पद्धत आहे. डोळ्यासमोर नसलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल चालु असलेल्या मानसिक प्रक्रियेलाच  ( Thought  Process)  आपण विचार असे म्हणतो.

 हे विचार आपणांस दिसत नाही.पण एकदा का ह्या विचारांनी आपल्या मानवी मनाचा ताबा मिळवला कि लगेच त्यानुसारच आपण सर्वजण वागायला सुरुवात करतो.तुसभर ही जागा सोडत नाहीत.उलट एकदा का तुम्ही विचार करायला लागला  कि क्षणार्धात आपली हालचाल बदलते.चेहऱ्यावर वेगळे हावभाव उमटायला सुरुवात होते ,राग रूसवा, फुगवा येतो वा आनंद,हर्ष येतो. आपण नाचतो काय, गातो काय ..मी तर बाबा गुणगुणत असतो.लहानपणापासूनच मला ती सवय आहे. त्यात आजवर काहीच फरक झाला .मी असाच आहे आणि असाच राहाणार..कारण ते माझ्या जिवंतपणाचे लक्षण आहे.हे माझ्या परिवाराला वा मित्रमंडळीना तुम्ही विचारू शकता. तर असो .आपण पुढे चालूया..

तर मी काय म्हणत होतो...हा..आलं लक्षात....न बोलणारा माणूस बोलायला लागतो...आजूबाजूस काय चाललंय. ह्याच काही त्यास देणे घेणे नसते. पण हे सर्वकाही विचारांवर अवलंबून असते व आपण एका वेगळ्याच विचारांत रंगून जातो.आपल्या  शरीरात  बदल निर्माण व्हायला  लागतात.त्यानंतर आपण सर्वजण त्यानुसारच वागायला लागतो ..विचारांचे प्रतिसाद उमटायला  लागतात..विचार विचार म्हणजेच काय??? त्यात दोनच  प्रमुख प्रकार आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत...त्यातला एक म्हणजे सकारात्मक विचार ( POSITIVE THOUGHT)  आणिक दुसरा नकारात्मक  विचार( NEGATIVE THOUGHT). त्याचे कार्य कसे चालते वा त्यास असे का म्हटले जाते....वगैरे वगैरे....प्रश्न अनेक...
ह्यावर आपण नंतर बोलूयात.कारण विषय फार कठीण व गहन आहे..तर असो ...

तर आज आपण कशावर बोलतोय.????... हा ..आठवलं...अरे हो , बोलता बोलता मी सुद्धा  विचारात पडलोय....तर आपणांस  विचार  कसे व का पडतात व हे कोठून येतात व केव्हा येतात...ह्याचा केव्हा तुम्ही  विचार  केलायं ...
मग  तुम्ही कुठेही असा,जसे घरात वा दारात  वा रस्तावर चालतायं  वा बोलतायं ...कामावर असा  या सुट्टीवर असाल..वा झोपाळ्यावर झुलतायं वा एकाच ठिकाणी शांत बसलेले असाल वा कोणाबरोबर तरी बोलत उभे असाल..कुठेतरी कोणाचे काही ऐकत असाल.मिटिंगमध्ये असाल वा घरात काही काम करत असाल वा हाॅटेलात जेवण करत असाल वा एकदा पिक्चर बघत असाल.तुमची भौगोलिक परिस्थिती काय आहे वा सभोवतालची वर्तमान स्थिती कशी आहे.तुमची शारीरिक वा बौद्धिक अवस्था काय आहे..तुमच्या बरोबर कोण आहे.. ह्याला काहीच अर्थ नसतो.कारण एकदा का तुम्हांस विचार यायला सुरुवात झाली  कि लगोलग तुमचे मन त्यानुसारच काम करणार...

ह्यात काहीच दुमत नाहीच...दुसऱ्या कोणालाही विचारा. कारण तुम्ही त्यावेळेस विचार करतायं.त्यामुळेच तुम्हाला ते समजत नाही वा दिसत  नाही.पण तुम्ही करत असलेल्या हालचाली दुसराच कोणीतरी दुरून पाहत असतो.तो तुम्हांस बघत असतो.तो तुमच्या जवळ येतो आणि तोच तुम्हांस म्हणतो कसा  " अरे कसला विचार  करतोस? आज काय झालंय. तुझे चित्त काही स्थिर दिसत नाही? तू कसल्या तरी विचारात आहे.एवढे काय झालंय? असे एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार तुम्हालाच करावा लागतो..बरोबर कि नाही ? अहो बोला..बोला.....अरे हे मी काय तुम्हांस विचारतोय...मी हे तर विसरून  गेलो कि तुम्ही  माझा लेख वाचताय..साॅरी ...साॅरी...मला माफ करा..क्षमस्व...

तर आज आपण कशावर बोलतोय.????... हो ..आठवलं...पण ह्याच्या अगोदरची स्थिती वेगळीच असते.
तो तुम्हांस जोरजोरात आवाजसुदधा  देतो पण तुम्हांस ते ऐकूच येत नाही वा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतात कारण तुम्ही तुमच्याच विचारांत गर्क झालेले असतात. तुम्हांस काहीच  समजत नाही. तो तुमच्या जवळ येतो व जोरात हलवतो तेव्हाच तुम्ही भानावर येतात. हे कसे काय घडते? ह्याचा कधी विचार केलाय ?  अरे थोड तुम्ही  थांबा. तुम्ही कसला विचार करतायं.ते काम माझ्यावर सोपवा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो..पण आज नको...कारण जे काही आतापर्यंत मी लिखाण केले आहे. ते तुम्हांस कसे वाटले...त्यावर तुम्ही तुमचे मत प्रकट करा व मला जरूर  कळवा. बाय. बाय...टाटा ... चला तर ....मग आपण उदधा भेटू या.....

आपला मित्र..

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर .
#######$$$$$$#$############

दिनांक- २० फेब्रुवारी २०२२

नमस्कार मित्र हो , सुप्रभात !!!!!

तर आज आपण विचारांचे सामर्थ्य म्हणजेच का
?सकारात्मक विचार आणि नकारात्मक  विचार  काय? आपल्या आयुष्यात त्याला ऐवढे काय  महत्व  आहे.?...ह्याबददल जरा समजून घेऊ या.

विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे हजार दा  विचार करत असतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात.

 मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत असतो.म्हणूनच तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार (POSITIVE  THOUGHT) हे माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. तसेच (NEGATIVE THOUGHT) हे नैराश्य आयुष्यात  लोटून  देतात. थोडक्यात काय माणूस विचारांच्या  सामर्थ्यावर  घडत असतो वा बिघडत असतो.असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.हे सामर्थ्य  इतके महत्त्वाचे असते कि एका शुल्लक गोष्टींमुळेच त्याचे पूर्ण  आयुष्य बदलून जाते.

उदाहरणार्थ एक सत्य प्रसंग वा माझ्या बाबतीत घडलेली घटना मी येथे  सांगतो, जेणेकरून तुम्हांस त्याची अनुभूती येईल. सकारात्मक विचारानं मी कसा घडलो.माझे आयुष्य  कसे बदलून गेले.ते मी पुढील  भागात सांगत आहे....

ही गोष्ट वा संदर्भ मी आपणांस सांगत आहे .ही गोष्ट  मागील अडतीस वर्षापूर्वीची आहे. साधारण  १९८४-८५ सालची ...मी तेव्हा माझे शालेय शिक्षण पूर्ण करून नुकताच बाह्य दुनियेत प्रवेश करत होतो.ती मायावी दुनिया  म्हणजेच आमची मुंबई...ती कशी आहे व तिला मायावी दुनिया का म्हणतात.  स्वप्न  ऊराशी बाळगून तिथे राहणारे लोक  वा ज्यांचा हा ना त्या कारणांनी प्रत्यक्ष संबंध आला असेल तेच तुम्हांस सांगू शकतात. मुंबईत राहत असताना काय फायदे झाले वा काय नुकसान..थोडं थांबा....तुम्ही काय म्हणतायं..... मुंबई आणि नुकसान? असे होउच शकणार नाही.तुमचे काहीतरी चुकतंय....अहो मी पक्का मुंबईकर आहे...मुंबई म्हणजेच  माझा जीव वा प्राण किंवा माझे अस्तित्व आहे. तर असो ...तो विषय थोडा बाजूला ठेवू या...

तर मी असाच एकदा माझ्या मित्राच्या घरी काॅटन ग्रीन ( मुंबईतील एक उपनगर) ला काही कारणास्तव  गेलो होतो. तो माझा जिवलग मित्र  होता.  मी माझे काम आटपून घरी जात होतो. वाटेतच मला फार लोकांची गर्दी दिसली. मग आठवू लागलो कि आज काय आहे.? कोणता सण वा सार्वजनिक संभारंभ वा छुटटी  वगैरे  आहे का ? का कोणीतरी  स्वर्गवासी झालंय का ? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. मी बैचेन झालो.माझे मन काहीच केल्या मला शांत बसू देत नव्हतं. कारण तो माझा स्वभाव ( स्वंयःप्रेरणेतून चौकशी  करणे ) आहे..लहानपणापासूनच  मी चौकस बुद्धीचा असल्यामुळेच थोडं धाडस करून रस्त्यावरून  चालणा-या एका अनोळखी माणसाला  रस्तातच थांबवून मृदू आवाजात विचारले कि साहेब हे काय आहे.ऐवढी गर्दी का आहे ? पहिल्यापासूनच  माझ्यावर माझ्या आजीचे संस्कार आहेत तेव्हा  कोणीही माणूस असो मग तो लहान असो वा मोठा,त्यास साहेब म्हणूनच आदराने हाक मारणे.त्याच्याशी आदराने बोलणे. हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे.तसे आमचे संस्कार आहेत. 

मला त्याच्याशी बोलल्यावर असे समजले कि ह्या ठिकाणी सद्गुरू वामनराव पै साहेबाचे प्रवचन चालू  होते.मग काय  मी तडक आतमध्ये ज्ञान मंदिरात घुसलोच व खुर्चीत जावून बसलो...मला फार उशीर झाला होता..मी समोर बघताच तिथे प्रत्यक्षात सद्गुरु वामनराव पै साहेब एक विचार सांगत होते.....# तूच  आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!!!!माझ्या  कानावर  ते शब्द पडले आणि मी त्या विचारांत रंगून गेलो.मला काहीच भान नव्हते...मी त्यांच्या विचारांशी एकरूप होऊन प्रवचन ऐकण्यात तल्लीन झालो होतो..एवढ्यात एक मोठा गजर झाला व मी भानावर आलो..सर्वजण  जीवन विद्येची विश्व प्रार्थना बोलत होते..

"हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे , 
सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव , 
सर्वांच भल कर , कल्याण कर , रक्षण कर , 
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ".

मी सुद्धा आपोआपच त्यांच्या सुरात सूर मिसळून गाऊ  लागलो.केव्हा वेळ निघून गेला ते मला समजेलच नाही.माझा उदय काळ सुरू झाला होता..मला साक्षात्कार झाला होता. माझी संगत एका थोर विचारवंत व विद्वान प्रवचनकाराशी होत होती.माझ्या बाल मनावर कायमची ही अक्षरे कोरली गेली.

# तूच  आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!!!!...

 त्यानंतर मी मागे वळून केव्हाच पाहिले नाही..उराशी एक स्वप्न बाळगून  बाहेर पडलो.आज कित्येक  वर्षानंतर मागे वळून पाहता.मी पाहिलेली  
माझी सर्व स्वप्न पूर्ण केलीत. यशाची  अनेक शिखरे  मी  प्रत्यक्षात पादाक्रांत केली. अखेर मीच माझ्या जीवनाचा ख-या अर्थाने शिल्पकार झालो.मला जसं माझं  आयुष्य  हवे होते तसेच  ते मी पुर्ण केले.. तो एक सकारात्मक विचार माझ्या  मनात  आला आणि सर्वच जग बदलून गेले...माझा महामार्ग मी स्वतःच निवडला आणि तो पूर्णत्वास नेला...

म्हणूनच म्हणतो" विचारात  सामर्थ्य असते.हे माझे स्व अनुभव आहेत....

आता तूर्तास मी येथेच थांबवून पुढील लेख आपण  विचार  कसे व कश्यामुळे उत्पन्न  होतात.  काय  केल्यावर  आपणास  फायदा  होतो..हे  उद्याच्या लेखात पाहूया. तोपर्यंत आपण सर्वजण मजेत रहा.पण तत्पूर्वी आजचा लेख कसा वाटला. ते जरूर कळवा...आपले मत वा अभिप्राय हे लेखकास आरशा समान असतात. त्यात तो आपल्या लिखाणाचे  प्रतिबिंब पाहून योग्य त्या सुधारणा करू शकतो..तेव्हा आपले विचार वा मत प्रकट करा...

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर ..

विशेष सूचना- हे संपूर्णत लिखाण मी माझ्या जीवनात घडलेल्या घटनांवर वा प्रसंगावर आधारित लिहित आहे.तेव्हा काही घटना वा प्रसंग ह्यात काही साम्य  आढळल्यास तो केवळ  एक दुर्मीळच वा दुर्लभ  असा योग समजावा .तसेच तुम्हांस तुमच्या  जीवनात आलेला अनुभव आणि माझ्या अनुभवाची तुलना करू नका. हि नम्र विनंती, लोभ असावा....धन्यवाद. ..

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ