सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

सुखाचा राजमार्ग...आचारविचार आणि सुख प्राप्ती.

आजचा विचार -सुखाचा राजमार्ग...आचारविचार आणि सुख प्राप्ती. 

"दैवयोग वा दैवी प्रसाद काय आहे ??? देवाचा आशीर्वाद वा कृपा कशी प्राप्त होईल ? देव देवळात नाही तर तो तुमच्या आमच्या  हदयात आहेत.पण आपण त्यास ओळखत नाही.ती एक अदभूत व अदृश्य शक्ति आहे.त्याचा आपल्याला भास आभास होतो पण दिसत नाही. जशी हवा.....सर्वत्र संचार आहे....केव्हा थंड ( हिवाळ्यात थंडीत कुडकुडतो) ...केव्हा गरम ( उन्हाळ्यात  लाहीलाही होते ).हे असे का ????आपण  थोडा वेळ घ्या आणि त्याबद्दल विचार करा.  दिवसातून एकदा, आपण इतरांबद्दल विचार कराल आणि इतरांच्या चेह -यावर आनंद कसा असेल.  आपण त्याला कशी मदत करू शकतो किंवा त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकतो.  जर आपण त्याबद्दल विचार केला तर कदाचित आपणास सार्वभौमत्व मिळू शकेल.  देव सर्वत्र आहे, फक्त आपण त्याला ओळखत नाही, म्हणून आपण दु: खी आहात.  सर्व काही आपल्या हातात आहे.  आपले विचार बदला, मग परमेश्वराचे चमत्कार पहा.  परमेश्वर नेहमीच तुमच्याबरोबर राहील आणि तुम्हाला कधीही दु: ख देणार नाही.

देव आपल्या जवळ काहीही ठेवत नाही तर त्याची परतफेड वेळ आल्यावर लगेच परत करतो.जे पेरलं ते उगवणार...कांदा जमिनीत लावला तर कांदाच येईल बटाटा नाही आणि तशी अपेक्षासुदधा करू नका.

थोर गायक कै.प्रल्हाद शिंदे  ह्यांनीच गायलेले एक गीत..."ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,

 क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर,

 ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण मृत्यूला न चुकवी कुणी थोर असो अथवा सान सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,

 मना खंत वाटुनी ज्याचे शुद्ध होई अंतःकरण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर.

एवढेच सांगितल जाते... माणसाने केलेल्या चांगल्या, वाईट कर्माचा हिशेब त्याला इथेच चुकता करावा लागतो. धनसंपत्ती, पैसाअडका लाख कमावला तरी शेवटी हाती काय लागणार? हे संतवचन आजही समाजाला आदर्श जीवन पद्धतीकडे नेत आहे.

मी कोण आहे, मी काय करतो आहे, मला काय करायला हवं, क्षणभर थांबून माणसाला आपला विचार करायलाही वेळ उरलेला नाही. नोकरी, घर, कार्यालयात आपण सहकारी व कुटुंबीयांसाठी दररोज संवाद साधतो. पण, कधी स्वत:शी संवाद साधला आहे का?

जर नाही तर अजून वेळ गेलेली नाही.वेळीच सावध व्हा...स्वतः बरोबर दुस-याचे कल्याण करा.त्यात आनंद द्या.त्यात परमेश्वराचा अंश लपला आहे ..तो ओळखा..दृष्टिकोन बदला.देव सर्वत्र आहे.त्याचा आशिर्वाद घ्या व दुस-यास चांगलेच आशीर्वाद द्या....

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर.

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ